mahanews MEDIA

या स्पर्धेसाठी १) ज्ञानरचनावादी अध्ययन- अध्यापन प्रक्रिया २) गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांच्या वाचन समृद्धीचे महत्व ३) शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे- काळाची गरज ४) शिक्षण प्रशिक्षणाच्या नव्या दिशा ५) जीवन व्यवहाराशी शिक्षणाची सांगड ६) विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासात सहशालेय उपक्रमांचे स्थान असे ६ विषय देण्यात आले होते. यापैकी एका विषयावर ३ हजार शब्दात सुवाच्च व स्वहस्ताक्षरात निबंध लिहायचा होता. बाळासाहेब यांनी सदर निबंध स्पर्धेत भाग घेऊन “शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे- काळाची गरज” या विषयावर निबंध लिहिला होता. बाळासाहेब हे डहाणू तालुक्यातील उपक्रमशिल शिक्षक म्हणून ओळखले जात असून या पारितोषिकामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.